Thursday, June 27, 2024

I have special place for her in my heart !!!

It’s a memory flash by google and showing memories 4 years ago….wooowhhh…a tiny face with pretty eyes are looking at me….smiling and crawling over the blanket and coming towards me, oh mumma just take me up and hug me…. 

I was unconscious when I saw her in hospital. Lying near me….She was sleeping….It was few hours I delivered a baby….I heard her crying voice before going to sleep and I was relaxed...I asked doctor hows the baby,she said..baby is fine …I asked her is it a baby girl or boy..she said, it’s a girl !!! I smiled...After few hours when I woke up, I tried searching her….she was sleeping and suddenly she woke up and looked at me…wow, the eyes are sooo beautiful….tears came up from my eyes and from that moment she is just and just mine….my tiny little miracle is having place in my heart..!!!

 She was so small..just like a cute doll….sometimes crying…sometimes playing…sometimes sleepy…sometimes just crawling everywhere looking for me or her dear ones…. I just feel it’s a miracle happen to me given by god….Her eyes, her smile, a tiny tooth I saw when she laughs, her tiny hand, tiny feet, some funny expressions !!! hummm .. many more….I always have one room in my heart for all of these… 

Day by day the tiny miracle is growing….She started sitting and ah that was just a moment when she suddenly started sitting by her own and when she realized that she started laughing…There were 2 smiles in the room…one was her and one was mine….hug, kiss and cuddling then lots of fun was there that time and yeah because that was first time happening with her and with me too….That cute ever laugh have a place in my heart forever !!! 

One day I was just relaxing in chair and thinking about having a cup of tea….So, I just wanted to go to kitchen.. when I started walking I saw she is also taking her few steps to come to me… She was trying hard to get up….step one by one…then fall down and again getting up….She was just busy being herself and trying and suddenly she took 4-5 steps continuously and the joy she had on her face was magical….My parents started clapping and calling her…come dear…come close to us and giving boost to her efforts and that 1..1.5 feet miracle was walking on floor and giving joy to all of us…The day I saw her doing all these, my tiredness, my stress gone away and I thanked god for being with us always….The tiny walk feet are having place in my heart from that moment forever..!!! 

The time when she was just new born…having tantrums….milk routine of 1..1.5 hours….playing..drinking..sleeping….crying..waking up…and that continuous till 1.5 years…Those were exhausting days, but all are not similar….The crawling stage…sitting stage….having her first teeth…trying for food after 6 months….walking phase…all were different and excited too…The day I remember, she started taking food with taste and liked it, I gave her parathas, cheese, curd rice, varan-bhat-tup, dudh poli, sheera, fruits etc. she started enjoying….and her sleep time increased at night for 3-4 hours….I was bit relaxed…. We took a tricycle for her….we went for hours in long street route to see cat and dogs and cows….trees, airplanes , a moon and that’s just new to her, as she is experiencing all that first time…I have seen curiosity in her eyes for first time experience in all things… She started pointing out things and tries to speak…That small pointing figure and first word I heard from her are always having place in my heart..!!! 

Such small moments with her are memorable and miraculous … A day out with her father… small trips within India…. Visits to gardens….spending quality time with parents….some random clicks on camera and getting candid pics….some are like a frame on wall…those were cute like her….my favorites…. 

I remember trying to get out of her diaper routine and wanted to start panty routine. We thought it will be tough…We thought that she will refuse or do pee everywhere…so we have ordered sofa and bed plastic covers. Then we took her to washroom and I told her to do pee… She was bit afraid to see first time peeing and thought of crying too….yeah and that’s obvious….peeing inside diaper is completely different and its sensitive for her… She was so matured to realize that its safe being pee at washroom …She hold my hand and laugh with tears….I was so emotional that time and felt heart full of care and love for her… She was just amazing for me….supporting me each and every time I wanted her to become… !!!

When other mothers says, we need to keep habit of this and that for child, my child didn’t put me in that trouble of making a habit…she listened, she had faith in us and she tried and made all that happened and then didn’t looked back… I love when she says “maya maya” and place her little hand on my face, kissing me….I love when she says “shambho shivahare shankara” while taking bath….I love when she tries everything by her own like opening her tiffin and eating food by herself, going to washroom and cleaning it, having glass of water and drinking by own, going to school and having her favorite shoes, going to playground, searching for new ideas and playing with same toys with new creativity…calling us by our names an smiling….Calling alphabets, colors when I was sleeping just beside her (which once I tried teaching her), and yes singing rhymes loudly when we are tired and waned to sleep…haha…I do remember I tried listening it at 1.30 pm midnight… 

Lot of people said, we need to do that, we need to do this, but for me she is exceptionally different from other children…supportive, understandable, adjustable, caring, loving and making me a proud mother all over times….She listens to both of us without argument, she understands and try to do things by own, she eat Indian traditional food by choice unlike junk foods and adjusting to environment that’s her bravery I must say… I hope our love and trust in her is making her to do all these…. We say, children are like god and taking care of them gives god’s blessing. In today’s world when I see struggling mothers, having lots of expectations from children, having competitions, struggling for habits, struggling for being a good mother, struggling for child’s health and many many more, I must say my girl made me proud without giving me a single thought of struggle…

 Today the time I am writing all these for her is because she is giving me cute moments to cherish and record somewhere, so that when she grow up and I want to tell cute stories of her I have lot many to tell…. 

She is grown up girl now…yes, she is 4….Today I took her to school….she is having habit of taking soft toys along with her while going to school….Thats so cute, but ahh school refuse to keep that with child….She cried first day, second day she refused to take it away , third day she kept it with her…Today she was going inside and teacher was like oh damn, she bought little shark with her again….teacher was in hurry to take her inside and suddenly she looked back, smiled at me and gave shark toy in my hand and said bye bye…The moment was so touchable and I felt emotional looking at my princess as like she is just made for me….we both smiled and walked away to gather lot and lot such moments every time..every day and forever…I took the toy and kept it inside bike…The bike was overloaded with raincoat, helmet , carry bags etc. I took them off and put inside the sack and made a space for little toy.. I know I have to keep the space for her everywhere with love, care, support always & forever !!! lots of love !!!

Thursday, November 9, 2023

आता खरंच पूर्वीसारखी दिवाळी राहिली नाही.....

 आता खरंच पूर्वीसारखी दिवाळी राहिली नाही.....


एक उसासा घेऊन मला आज खरंच असा वाटलं....कि ह्या दिवाळीमध्ये पूर्वीसारख्या दिवाळीची मजा राहिली नाही....किती आनंदात असायचे ते दिवस, जेव्हा आजी आजोबा आई बाबा सर्वजण मिळूनमिसळून  सण साजरे करायचो....तो कोणताही सण असो, सगळी तयारी १-२ आठवडे आधीच सुरु व्हयाची...दिवाळी ची तयारी तर खूप अगोदर पासून चालू व्हयाची...बाबा आकाशकंदील घरी तयार करायचे....आई फराळाचा करायच्या तयारीला असायची....मी घरातलं डेकोरेशनच पाहायचे....आजी आणि मी रांगोळीचे डिसाईन ठरवून ठेवायचो..... आजी आईला सुद्धा फराळामध्ये मदत करायची....सगळी धान्य बाबा आणून द्यायचे आणि ती पाखडून धुवून ठेवून किंवा पीठ तयार करून ठेवली जायची...घरामध्ये रोज पदार्थांचा घमघमाट असायचा...आणि हा घमघमाट आला कि दिवाळी आली रे.....असा मनापासून आनंद व्हायचा...आणि अंगात एक ऊर्जा यायची....दिवाळीला एक आठवडा राहिला कि शनिवार रविवार मध्ये जाऊन खरेदी व्हायची...सूर्य दिवशी साहित्य सगळं आणून ठेवला जायचा....नवीन ड्रेस , नवीन पणत्या, फटाके, अत्तर , उटणं , बत्ताशे साळी लाह्या, लक्ष्मीपूजनासाठी झाडू, फुले, हार, रांगोळी आणि त्याचे रंग  वाह म्हणजे सगळं मस्तच....भरभरून उत्साह...घरी दिसायची माळ लावली जायची...आकाशकंदील लावला जायचा...आणि उद्या पासून दिवाळी चालू....पहाटे लवकर उठून रांगोळी काढायची म्हणून लवकर झोपून जायचो....पहाटे ४ वाजता सुगंधी उटण्याने अंघोळ व्हायची आणि रांगोळीची तयारी चालू....४ वाजता सुरु झालेली रांगोळी सकाळी ९ वाजता पूर्ण व्हायची...आणि एवढ्या मेहेनतीने बनवलेली ती रांगोळी पाहून मन तृप्त व्हायचे ..वसुबारसेला समोर गायी यायच्या...त्यांची पूजा केली जायची....त्यांना नैवैद्य दाखवून मग घरी फराळाची तयारी चालू व्हायची....मी बाबा आणि आजोबा मग सकाळी पूर्ण सोसायटी मध्ये एक फेरफटका मारून यायचो...." दिन दिन दिवाळी....गायी म्हशी ओवाळी " सर्वायनच्या घरी हेच दुर्श्य आणि झगमगाट....डोळे तृप्त व्हायचे... मधेच कोणीतरी फराळाला हाक मारायचे...मग त्यांच्या घरी जाऊन मस्त पैकी चहा फराळ करून निघायचो...घरी आलो कि गरमागरम चकली ताटामध्ये वाढलेली असायची आणि आम्ही त्यावर ताव मारायचो.... संध्याकाळी फटाक्यांची आतिषबाजी आणि नवीन ड्रेस घालून पूर्ण सोसायटी मध्ये मिरवायचो....मित्र मैत्रिणी एकत्रपणे भेटायचो आणि गप्पा असण्यात वेळ सहज निघून जायचा.... नारकच्छत्रुडशी ला आजी यमदीपदान करायची....लक्ष्मीपूजनाच्या तयारी तर जन्नत च असायची....देवघरापाशी केलेली पूजा,,,समोर ठेवलेले पूजा साहित्य आणि फराळ....पणत्यांची रांगोळी आणि सुगंधी धूप ...सर्वत्र वातावरण प्रसन्न करायचे.... पाडवा आला कि आई बाबांना आणि आजी आजोबाना ओवाळायची.....सकाळी तेल उटणं लावून अभ्यंग स्नान व्हायचे.... तडतडी उडवली जायची,....नंतर आम्ही सगळे जण सारसबागेमधे जायचो...."दिवाळी पहाट" ची गाणी आणि तरुण कलाकार...खूप सुंदर मैफिली असायचा..पहाटे ४ ते ६ असा हा कार्यक्रम आम्ही न चुकता पाहायला जायचो..तरुणाईचा उत्साह तर वाखाणण्यासारखा असायचा...पहाटे नऊवारी पैठणी साड्या नेसलेल्या मुली आणि धोतर झब्बा घातलेले तरुण कंदील आकाशात सोडायचे....रात्रीचा अंधार पण पहाट होताना आकाशात सोडलेले ते दिवे पाहताना खूपच मस्त वाटायचे....सुधीर फडकेंचा गीत रामायण असो वा दिवाळीची गाणी असो, हात आपोआप ठेका धरायचे... त्या दिवाळी च्या कुडकुडत्या थंडीमध्ये पण दिव्यातली ऊर्जा मिळाल्यासारखी वाटायची...दिवाळीच्या दिवसात आजूबाजूला पहाटे गाण्यांचा प्रोग्रॅम असायचा....पहाटे उठून कुडकुडत्या थंडी मध्ये शाल घेऊन असे प्रोग्रॅम ऐकायची मजा काही औरच....४-५ दिवस असे निघून जायचे ..

दसरा असो वा दिवाळी....गणपती असो वा नवरात्री...सर्व सण एकत्रितपणे जमून ...कोणी काय कायचे ..कसे करायचे चर्चा करून केले जायचे...त्यामुळे त्यामध्ये काही "कमतरता " राहायची नाही....वातावरण पण मनमोकळे आणि खेळीमेळीचे होऊन जायचे....आणि कोणी दिलेल्या कामात कानी नावीन्यपूर्वक केले तर त्याचे कोडकौतुक व्हायचे ते वेगळेच....

खरंच हि मजा शब्दात वर्णावी तेवढी कमीच आहे....आता अशी आजी...असे आजोबा...असे मोकळे घरदार आणि मोकळी नाती मिळणे म्हणजे पण अवघड वाटते....


खरंच सणांची हि गम्मत नुसती दिखावासाठी न ठेवता एकत्रितपणे करण्यातच आहे....हीच आपली संस्कृती आहे आणि ती आपण पुढे आपल्या मुलाबाळांची जातं करून ठेवणे खूप खूप गरजेचे आहे....

Thursday, December 29, 2022

तू तेव्हा तशी....

 आयुष्य एक प्रवास असतो, आणि ह्या प्रवासाची सुरवात आपल्या आई बाबांच्या छत्रछायेखाली होते...आपण लहान असतो, तेव्हा जे संस्कार दिले जातात त्याचा पाया हा पिढ्यानपिढ्या जपलेल्या संस्कृतीमध्ये रुजलेला असतो...आई बाबांच्या सानिध्यात असतो, तेव्हा विचार प्रगल्भ होत जातात, शिकवणुकीतून आपण घडत जातो....आणि आपण एक व्यक्ती म्हणून तयार होतो.... एक माणूस म्हणून आपले विचार कसे पाहिजे, समाजाशी कसे वागायचे, भरपूर ज्ञान प्राप्त कसे करायचे...शारीरिक मानसिक स्वास्थ्य कसे जपायचे....भरपूर शिका, भरपूर खेळा...आनंदी राहा...त्यासाठी भरपूर मेहेनत घ्या...कष्ट करा....योगसाधना करा...भरपूर खा पण व्यायाम करून ते जिरवायची ताकद पण ठेवा...भरपूर चाला...मधुर आणि कानाला छान  वाटेल असे संगीत ऐका...ते मनात रुजवा ..असे संस्कार लहानपणापासून शरीरावर आणि मनावर बिंबवले जातात...आणि त्यामधूनच "मी" एक व्यक्तिमत्व तयार होते....

ह्या सगळ्याचे महत्व किंवा त्याची गंभीरता लहान असताना तितकीशी जाणवत नाही...आपण तेव्हा फक्त घडत असतो....समजून घेत असतो....जे आपण घडतोय, ते आपल्याला साहजिकच आवडत असते.....त्यानुसार फक्त आपण पुढे पुढे जात असतो...एखाद्या निरागस मुलाप्रमाणे....आपला हाथ आई बाबांच्या हातात असतो...आणि त्यामध्ये एक विश्वासाचे, प्रेमाचे आणि आदराचे घट्ट नाते असते....तोच हाथ आपण आयुष्यभर एकत्र चालण्यासाठी हातात दिलेला असतो....आपण लहान असताना ते आयुष्यभर !!!

खरी परीक्षा तर नंतर सुरु होते, जेव्हा आपण मोठे होते आणि आई बाबांच्या छात्रछायेपासून लांब जातो...निसर्गाचा नियमच आहे तो....पुढे पुढे जाणे...आता आपण जे शिकलोय ते जपणे, वाढवणे आणि पुढच्या पिढीपर्येंत नीट पोहचवणे गरजेचे असते....

ह्यासगळ्या मध्ये बऱ्याच गोष्टी असतात....ज्या छोट्या छोट्या वाटतात पण समजणे महत्वाचे वाटते... लहानपणी आजोबा तासनतास बागेमध्ये असायचे....तेव्हा वाटायचे अरे एवढा वेळ आजोबा काय करतात ह्या झाडाझुडपांपाशी? पण आज जेव्हा एक रोपटे लावायची वेळ येते तेव्हा समजते कि ते फक्त मातीमध्ये रुजवणे नसते, त्याला त्याच्या वाढीला साजेशी अशी कुंडी आणणे, त्यात लाल माती घालणे, खत घालणे मग ते रोप नाजुकरित्या त्यामध्ये लावणे, माती घट्ट दाबणे आणि मग पाण्याचा फवारा मारणे आणि काही दिवसांनी रोगर मारणे महत्वाचे असते....कुंडी सूर्यप्रकाशात ठेवणे आणि वेळोवेळी त्यांना पाणी घालणे महत्वाचे असते....हे एका रोपाचे म्हणतो आणि त्यांनी तर अशी हजारो झाडे आमच्या अंगणात लावली....जोपासली आणि लहान मुलांप्रमाणे त्यांचे संगोपन केले....गावठी गुलाबाला तर रोज २५-३० फुले असायची.....गुलाबाची वेगवेगळे प्रकार ते स्वतः शोधून आणायचे आणि लावायचे.....घराच्या दारात पारिजातचे झाड होते....गेट उघडताना तिथे फुलांचा सडा असायचा आणि त्याचा सुगंध दरवळत असायचा....घरी येणाऱ्यांचे जणू तोच स्वागतच करत असायचा... त्याच्या जवळच मोगरा, जाई, जुई, कुंदा, हजारी मोगरा ह्यांची सुगंधी झाडे यायची....बाजूला आंबा, जांभूळ, पेरू, चिक्कू, आवळा, पपई, नारळ  अशी फळझाडे लावलेली होती....प्रत्येक ऋतूला एका तरी झाडाला फळे आलेली असायची आणि त्याचा आस्वाद आम्ही सगळे घ्यायचो...मागच्या बाजूला वाल, तोंडली, कारले, टोमॅटो, कांदापात, आलं, बटाटा, अळू , विड्याची पाने, मेथी, कोथिंबीर अशी भाज्यांची रोपे लावलेली असायची....घरात नेहमी ताजी भाजी व्हायची...चला आज हे तोडून आणू, ते तोडून आणू असे आजोबा म्हणायचे आणि मी पळत सुटायचे...खूप मजा वाटायची....

सकाळी उठल्यावर आजी गात असलेले श्लोक कानावर पडायचे....ती १..१.५ तास सगळे नामस्मरण, श्लोक, कहाण्या म्हणायची...ताल सुरात म्हणाले ते शब्द कानामध्ये अजून पण घुमतात....प्रसन्न वाटते...कधी कधी हॉल मध्ये बिरड्याच्या बेत असायचा....जवळपास १ किलो बिरड्या उकडवून हॉल मध्ये आई आणून द्यायची..त्याची साले काढताना जी मजा यायची ती मजा औरच.....हिवाळा मध्ये आजोबा मंडई मधून हिरवेगार मटार आणायचे....ती निवडत बसणे आणि नंतर आईने केलेल्या मटार कारंजी वर मस्त ताव मारणे हा बेत असायचा....

माझे काका आजोबा आणि काकू आजी म्हणजे आईचे आई आणि बाबा....साक्षात देवमाणसेच !!! कधी मी त्यांना जोरात बोलताना , रंगवताना , आरडाओरडा करताना पहिले नाही....आलेल्या सर्वांचे हसून, आपलेपणाने स्वागत ते करायचे....दोघे साक्षात विष्णू लक्ष्मीचाच जोडा होता... त्यांच्यातली प्रेमलता, ममता, आपुलकी, धैर्य आणि त्यागाची वृत्ती कदाचितच कोणामध्ये असेल....

माझा बालपण खूप लाडात गेले....त्यांच्या कडे गेले कि खाण्यापिण्यापासून....खेळण्यापासून...सगळ्या गोष्टी ते लाडाने करायचे....एका फुलाप्रमाणे जपायचे....मुलामध्ये मूळ होऊन जायचे....ज्ञानाच्या गोष्टी सांगायचे.....देवाधर्माच्या खूप साऱ्या गोष्टी त्यांनी माझ्या मनावर बिंबवल्या...त्याचे संस्कार कायमचे मनावर उमटले आहेत....

वाचनाची आणि देवाधर्माच्या आवड मला त्यांनी लावली....पुस्तके वाचणे, शेतात लांब फेरी मारणे, भरपूर व्यायाम करणे, सुद्धा सात्विक जेवण करणे, अभंग गाणे....गोरगरिबांची सेवा करणे, मुक्या जीवांवर प्रेम करणे....ह्या गोष्टी दाखवल्या आणि असे मनामध्ये बिंबवले....ते कायमचे !!!

आता ते नाहीत...पण सतत असे वाटते कि त्यांच्या हाताचा मऊ स्पर्श अजूनही माझ्या डोक्यावर आहे आणि ते हसरे चेहरे....निरागस प्रेमाने भरलेले डोळे तोच साधेपणा माझ्या नसानसात आहे...

आई माझी खूप हौशी....तिच्या मधला उत्साह अजूनसुद्धा भरभरून आहे, कि मी तिला विचारत असते कि तू कुठून इतकी शक्ती आणतेस....खरंच !!! लहानपणी गोल्डस्पॉटचा केक ती करायची आणि त्यावर बडीशेप च्या गोळ्या लावायची....तोच केक खूपच खास होता आणि अजूनही त्याचे अप्रूप वाटते.....ती नानकटाई,बिस्किट्स , चोकोलेट्स असे सगळे पदार्थ करण्यात तरबेज होती आणि पटापट ती करून सगळ्यांना चकित करून टाकायची....टोमॅटोचा सॉस तर सगळ्यांना एवढा आवडायचा कि आमच्या घरी सतत तो होत असे... काळा मसाला हि तिची खासियत आहे...अजूनही घरी मसाला बनत असेल तर जो घरभर वास सुटतो तो अद्भुत आहे....

स्वयंपाकात कुशलता तर तिची आहेच पण बाहेर सुद्धा कलाकुसर करणे, कशिदा काम करणे, आमचे ड्रेस आणि साडी ब्लाउज ती घरीच बनवत असे....प्रत्येक नवीन गोष्ट शिकणे आणि त्यामध्ये कुशलता आणणे तिला जमायचे आणि अजूनही ती नवनवीन गोष्टी शिकायला उत्सुक असते....

मला लहानपणी गाण्याची आवड तिने लावली....आज जेव्हा संगीताचे महत्व उमजते तेव्हा तिच्या हेतूची जाण होते आणि मी तिची कृतज्ञ होते....गाण्याची आवड असो...स्वयंपाकाची...व्यायामाची...अभ्यासाची....खेळाची....सगळ्या गोष्टी तिने मला सांगितल्या आणि वेळोवेळी त्यामध्ये उतरवले....तिचे विचार त्या काळात खरंच आधुनिक होते....जेव्हा स्विमिंग हि व्याख्या नवीन होती तेव्हा तिने मला स्विमिंग कॉस्चुम आणून दिला होता आणि त्यामध्ये आवड निर्माण केली होती....

बाबा माझे कडक स्वभावाचे पण मनातून तेवढेच काळजी करणारे....लहान असेपर्येंत यांचा खूप धाक वाटायचा..भीती वाटायची...पण पुढे जेव्हा कळले कि हा धाक म्हणजे त्यांची माझ्यासाठी असलेली काळजी आणि प्रेमच आहे...तेव्हा त्यांच्या बद्दल चा आदर अजून वाढला....आजही आठवते मी आईच्या बाबांकडे म्हणजे आजोबांकडे राहायला जायचे मे महिन्यात आणि तिथून येताना बाबा काहीतरी surprise आणायचे...हिरो होंडा ची सायकल असो वा FM रेडिओ वा coloured TV ...काय मजा यायची...!!!.उड्या मारून मारून नाचून मी दमून जायचे...शाळेपासून ते माझ्या इंजिनीरिंगची ऍडमिशन असो, बाबा नेहमी धावपळ करायचे...प्रत्येक वेळी ते माझ्या बाजूला उभे असायचे....एक भक्कम सपोर्ट म्हणून...सायकल शिकवणे, गाडी शिकवणे...शाळेतली वह्या पुस्तक दप्तर आणणे....सगळं सगळं काही तेच करायचे...शाळेत मध्ये निकालाच्या वेळेस उत्सुकतेने ते हजार असायचे आणि मला प्रोत्साहन द्यायचे...अश्या अनेक गोष्टी, ज्या लिहिण्यासाठी कदाचित मला पान अपुरी पडतील...!!! आता अजूनही वाटते कि बाबा आहेत ना, ते आहेत बाजूला तुझ्या...काय काळजी आहे...ते सगळं काही नीट करतील...काय चूक काय बरोबर सांगतील...आणि मी त्यांच्या छोट्याश्या मुलीप्रमाणे त्यांच्या हातात हात घेऊन उभी राहीन...

घरी आले कि दारात आई अजूनही स्वागताला उभी असते....कशी आहेस...तब्येत बरी आहे ना...व्यायाम वैगरे करतेस ना...अजूनही विचारते, खूप खूप छान वाटते...

आज जेव्हा मी एका मुलीची आई आहे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू आठवतात आणि त्यांचे महत्व समजते....आज देवाची मी आभारी आहे, ज्या गोष्टी तू मला दिल्यास...आणि जी लोक मला तू ईश्वररूपाने दिलीस....खूप खूप आभार !!!

तुम्ही दिलेले संस्कार आणि माझी ज्या प्रकारे माझी जोपासना केली आहे, तशीच माझ्या मुलाची करण्यासाठी ईश्वर मला बुद्धी, बळ देवो...मला समर्थ बनवो.....

Tuesday, August 30, 2022

स्वत्व

 जग म्हणजे काय? माणसाने बनवलेले एक मायाजाल.ह्या मायाजालात मनुष्य जन्म घेतो आणि मृत्युरूपी सत्याला घाबरतो.माणूस आज आहे,उद्या नाही.संस्कृतमध्ये श्लोक आहे,"जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च। तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि" जन्म घेणाऱ्याच्या मृत्यू अटळ आहे आणि मरणाऱ्याचा जन्म अटळ आहे,ह्या अटळ गोष्टी समजत असून सुद्धा मनाला चुटपुट, रुखरुख लावून जातात.हि अटळ गोष्ट कधी कधी पटत नाही,मन ते स्वीकारायला तयार होत नाही, आणि त्या क्षणी चालू होते, ती मनाची घालमेल....हे असं का? हे आताच का झालं?काही दिवसांपूर्वी असं काहीच वाटत नव्हतं मग आता असे का?एका मागोमाग एक प्रश्न, मागच्या आठवणी, प्रसंग आणि तिथून फुटत गेलेल्या वाटा, आडव्या तिडव्या .. खरंच आपल्या विचारांना सगळीकडे मोकाटपणे धावायची मुभा असते, अगदी सैरावैरा..आपले विचार आपल्या मनातल्या कोपऱ्यातल्या भावनांना समोर आणतात.मनाचा कोपरा हा आपला अत्यंत नाजूक भाग.बऱ्याचदा आपल्याला न पटलेल्या,नकोश्या वाटणाऱ्या,अश्या गोष्टी आपण तिथे लपवून ठेवलेल्या असतात आणि विचारांना बरोबर तिथे डोकवायला आवडत असते... अश्या ह्या नाजूक कोपऱ्यात असतात काही नाती....काही आपली...काही आपली असून नसलेली....काही आता आत्तापार्येंत होती, पण अचानक संपलेली....काही नवीन सुरु झालेली पण अजून तयार होणारी...अजून बळकट होणारी नाती आणि त्यांच्या भोवती असणारे आपले विचार,सुसाट वाऱ्याप्रमाणे इकडून तिकडे नुसते फिरणारे-अस्वस्थ करणारे, कधी शांत करणारे,गंभीर करणारे,कधी डोळ्यात टचकन पाणी आणणारे,कधी स्वतःलाच समजावणारे,बळ देणारे,जगण्याची उमेद देणारे आणि कधी प्रश्नांच्या चक्रव्यूहात खोल खोल बुडवून टाकणारे...!!!

हा शांत चेहऱ्यावरचा अशांतपणा बहुतेक कोणाला समजलेला नसतो,कदाचित स्वतःलासुद्धा !!! खूप प्रश्न घोंगावत असतात ,काही चुकतंय का म्हणून अपराधेपणाची भावना, त्यात स्वतःने  स्वतःला घातलेली समजूत आणि बहुतेक वेळा वेळ भागवून नेण्यासाठी मुकाट्याने मनाला शांत बसण्याची केलेली विनंती...ह्यामध्ये आपण मनाला खूप समजवतो, थोडी चलबिचल होते, वाटत राहते कि बास आता खरंच काही नको....शांतता आणि फक्त शांतता...!!!
जोरात सुरु झालेले हि वादळ अचानक कमी कमी होत जाते आणि तेवढ्याच जोरात आपल्याला वास्तवात आणून भिरकावून देते, आपण शुद्धीवर येतो आणि मग प्रश्न पडतो...आता पुढे काय?
मागची सगळी नाती आठवतात...एकामागोमाग एक...सगळेजण...सगळे चेहरे आणि त्यांनी आपल्यासोबत घालवलेले चांगले - वाईट सगळे प्रसंग एका ध्वनिफितीप्रमाणे सर्रकन डोळ्यासमोरून निघून जातात.. त्यांचे आपल्यासोबत असलेले नाते उलगडत जाते.हळूहळू सर्व गोष्टींचा अर्थबोध होतो.जे आपले होते, ते शेवटपर्येंत आपलेच होते आणि आपल्या मनात, आपल्या स्मरणात कायम ते राहणार आहे,जे आपले नव्हते ते निघून गेले, काही अर्धवट तर काही पूर्णांत्वाने सोडून निघून गेलेले आहे आणि आता आपले जे होणार आहे, ते स्वीकारायला तयार राहा...
तू आहेस तर तुझे जग आहेस...तू नाहीस तर काहीच नाही....मोकळी हो...मोकळेपणाने स्वीकार...जे काही आहे ते...तू आणि तुझे विचार समरूप होऊ दे ....उड त्यांच्याप्रमाणेच ...मोकळ्या आकाशात....ह्या जन्म मृत्यूचे रहस्य कदाचित तुला उलगडेल...त्यासाठी एक खोल श्वास घे..मोकळा श्वास घेऊन "स्वत्व" अनुभव ...त्या मोकळ्या श्वासांमध्ये फिरणारे तुझे विचार आता काहीतरी वेगळे नक्कीच असतील.....नक्कीच !!!

 

Tuesday, March 23, 2021

मरावे परी किर्तीरूपी उरावे...

 मरावे परी किर्तीरूपी उरावे....समर्थ रामदासांचे हे बोल....ज्याने जगण्याचा खरा अर्थ शोधला आणि जगला, तो किर्तीरूपी सर्वांच्या मनात नेहमीचं अजरामर राहिला....

आजच्या युगात स्वतःसाठी जगण्याची धडपड करणारा माणुस आपण बघतो...स्वतःचा विचार, स्वतःची प्रगती, सुखं-दुःख, ह्या कलयुगात स्वतःहाला जगवण्याची धडपड आणि ह्या सगळ्यामध्ये गुरफटल्यामुळे जगून पण न जगलेला हा मनुष्यप्राणी.... खरंच अजब जग आणि अजबच त्याची दुनिया....
अश्या ह्या जगात एखादा जीव आपल्याला सगळ्यांपेक्षा वेगळा दिसतो, जो स्वतःसाठी न जगता दुसऱ्यांसाठी जगत असतो....ते सुद्धा तळमळीने, निर्विकारपणे...
सौ. शुभदा जोशी...एक आदर्श शिक्षिका, एक आदर्श गृहिणी, एक समाजसेविका, मूकबधिर मुलांची सर्वेसर्वा - त्यांची आई...मी तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा पाहिले, तेव्हा तंतोतंत सुधा मूर्तींचा भास झाला...अतिशय शांत चेहरा, त्यावर निर्मळ हास्य,शांत बोलके डोळे, तेजस्वी पुण्यवान चेहरा, केसांची घट्टसर वेणी, साजेशी सुंदर इस्त्री केलेली साडी आणि खांद्यावर एक साधीशी बॅग...हाताचा नमस्कार करून सर्वांशी अदबीने बोलणे....शांत प्रसन्न चेहरा आणि तितक्याच शांतपणे बोलणे...तुमच्याशी बोलण्याचा विषय सुद्धा वेगळाच असायचा...समाज आणि त्याच्याशी आपण काही देणे लागतो अश्या काहीसे विचारांचे...तुमचे वाचन, त्यातून आलेली बुद्धिमत्ता, धाडसी वृत्ती आणि एकाग्रता, कल्पकता सर्व काही भारावून टाकणारे होते...तुमच्या घरी आले तर तुम्ही कधीचं एकट्या दिसल्या नाहीत, सतत भोवती लोकांचा , छोट्या मुलांचा गराडा असायचा आणि त्यांच्या मध्ये गर्क होऊन , मुलांमध्ये मूल होऊन तुम्ही समरूप झालेल्या दिसायच्या...एक शिक्षिका म्हणून तुम्ही मुलांना घडवले तसेच त्यांना जगायला सुद्धा शिकवले...मूक बधिर मुलांचा ध्यास, श्वास, हास्य म्हणून तुम्ही जगला आणि त्यांना सुद्धा जगायची प्रेरणा दिली...समाजसेविका म्हणून अहोरात्र कष्ट करून, पैश्यांची तमा न बाळगता, तुम्ही मुलांना शारीरिक तसेच मानसिक स्तरावर विकसित केले...आज तुम्ही हजारो अश्या मुलांच्या पालनकर्ता आई आहात...
तुमच्याविषयी मी अजून काय बोलणार !!! आपली भेट ती केवढी - कदाचित काही दिवसांनी ...काही क्षणाची आणि तुमच्याबद्दल लिहिणे म्हणजे गगनाला गवसणी घालण्यासारखे आहे...पण त्या काही भेटींमध्ये सुद्धा इतकी शक्ती होती की तुमचे हे जग सोडून जाणे खूप चुटपुट लावून गेले...आज असे वाटते की तुमच्या सानिध्यात काही काळ जरी मी असते, तरी आज मी खूप वेगळी असते...खूप वेगळी...खंत वाटते..
आजच्या काळात माणूस खूप एकलकोंडा झाला आहे, स्वतःपुरता विचार करणारा स्वार्थी प्राणी झाला आहे...स्वतःच्या जगण्यात तो इतका मश्गुल झाला आहे की सर्व काही देवाने दिले असताना सुद्धा तो समाधानी नाही...अहंपणामुळे तो स्वत्व , भान, मान, आदर, प्रेम सर्व गमावून बसला आहे...जे आहे त्याची पर्वा न करणारा, हव्यासाने जगणारा, पोकळ विचारांचा असा हा मनुष्यप्राणी दुसऱ्यांचा विचार कसा करणार ? दुसऱ्यांची काळजी कशी घेणार? " तुझे आहे तुझ्यापाशी तरी तू जागा चुकलाशी" खरंच !!! कित्तेक कोटी जन्मानंतर मिळालेला हा जन्म सत्कार्यासाठी, समाजकल्याणसाठी आणि लोककल्याणासाठी वाहायला पाहिजे ..आज समाजाला आपली गरज आहे आणि त्याचे आपण देणं लागतो...आणि देवाने हे आयुष्य त्यासाठी दिले आहे... राग, लोभ, मद- मत्सर, तिरस्कार, गर्व, फुशारक्या, लालच, वासना ह्या शत्रूंनी घेरलेल्या मनुष्य प्राण्याला स्वतःच्या आयुष्याचा खरा अर्थ कसा सापडावा? कदाचित त्यासाठी तुम्हाला परत जन्म घ्यावा लागेल...🙏 

Tuesday, December 8, 2020

चार दिवसांची (बाळंतीण) माहेरवाशीण....

 चार दिवसांची (बाळंतीण) माहेरवाशीण....


मुलीचे लग्न होते,आणि मग "सासुरवाशीण" , "माहेरवाशीण", पुढे जाऊन मग "बाळंतीण" ही सगळी विशेषणं आपोआपच मागे लावतात, आणि एक अल्लड, मनमोजी, स्वतंत्र अशी पोर अचानकच भावनाप्रधान, जबाबदार, हळवी, धाडसी बनते....लग्नाची नवीन वर्ष पानामधून दवबिंदू निसटावा, तशी भर्रकन निघून जातात, आणि ह्यामध्ये "ती" अजूनही स्वतःला शोधत राहते.... त्या दोघांच्या संसाराला पूर्णत्व मिळते, ते बाळाच्या आगमनाने... दोघेही खूप खुश होतात, एका नव्या चाहुलीची वाट पाहण्यात....
बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्मच असतो, आणि ते अगदी खरे आहे....9 महिने पोटात जीव वाढवणे... त्याच्या बरोबर उठणे, झोपणे, त्याच्यासाठी खाणे, त्याच्यासाठी हसणे, आनंदी राहणे, औषधं घेणे, जॉब-व्यायाम-वेळेवर उठणे-आवरणे- अश्या बऱ्याच नेहमीच्या सवयींना स्वाहा करावे लागते....पण ह्यामध्ये आपल्या नवऱ्याची साथ सदैव असते, जी आधार देते आनंद देते...
खरं म्हंटलं तर, बायकांचा पुनर्जन्म हा 2 वेळेस होतो, एकदा लग्न झालं की आणि एकदा मुलं झालं की....दोन्ही वेळेस, तिची ती कधीच राहतं नाही....सर्वस्वी बदलते, दुसऱ्यांची होते...त्यांच्यात मिसळून जाते....
आणि ह्या सगळ्यात पदोपदी तिला माहेरची आठवण होत असते...अर्धे आयुष्य ज्या घरी तिने व्यतीत केले, ती आस, ओढ तिला लागते आणि 4 दिवसांसाठी ही माहेरवाशीण बाळासोबत माहेरी राहायला येते...आई बाबांना फोन जातो, आज मी येते बरका..." हो हो ये ये खुशाल, आम्ही वाट पाहतोय" असे म्हणत आई बाबांची तयारी चालू होते... घर झाडून पुसून स्वछ केले जाते, नवीन बेडशीट, पडदे घातले जातात...आवडीच्या गोष्टी फ्रीज मध्ये आणून ठेवल्या जातात....बाळासाठी खेळणी, नवीन कपडे आई अगदी आवडीने आणून ठेवते...गरम पाण्याची सोय, बाळासाठी खाण्याची जय्यत तयारी केली जाते...पेज, केशर बदाम पावडर, केळं घालून साजूक तुपातला शिरा (लापशी), शेवयांची खीर, तांदुळाचे घावन, टोमॅटो चा उपमा, सातूचे पदार्थ असे एकाहून एक पदार्थांची जय्यत तयारी केली जाते...घरी आले की भाकरी तुकडा ओवाळून, गरम पाण्याने पाय धुवून आमचे स्वागत केले जाते आणि घरात हास्याचा एकच सूर घुमतो...गळाभेटी, बाळाचे लाड आणि खूप गप्पा ह्यांमध्ये दिवस कसा निघून जातो कळतं नाही... तिच्या हातचे पदार्थ चापून खाल्ले जातात..त्यामध्ये घरचा अळू, विडा, ओवा, आले, टोमॅटो, बटाटा आणि अश्या अनेक गोष्टी असतात...बाळाचे लाड तर खूप केले जातात...आजोबा आजीसोबत खाणे, फिरणे, बागेत चक्कर मारणे, बालगीते ऐकणे, दंगा आणि मज्जा...
रात्री झोपायची वेळ येते तेव्हा आई पाठीवरून हात फिरवते आणि म्हणते, खूप दमली असशील ना, तू शांतपणे झोप...मी बाळाकडे पाहते... माझा सगळा शीण ह्यामुळे एका क्षणात निघून जातो आणि कित्तेक महिन्यांपासून दमलेली मी, उशीवर डोके ठेवून बिनधास्तपणे झोपून जाते....सकाळी उशिरा जाग येते आणि बाळाच्या आठवणीने मी ताडकन उठते आणि बघते तर बाळ आजीची गाणी ऐकत ब्रेकफास्ट करण्यात मग्न असते...तेव्हा डोळे पाणावतात...आणि मी दोघींना मिठी मारते...
संध्याकाळी बाबा म्हणतात, जा एक चक्कर मारून ये गाडीवरून...आणि मी खूप दिवसांनी गाडी हातात घेते आणि long drive ला जाऊन येते...प्रसन्न मनाने घरी येते...
दिवस सरत असतात, वेळ पुरत नसतो...नवऱ्याच्या आठवणीने आता सासरी जायची वेळ येते आणि मी पुन्हा सज्ज होते...पण ह्या सगळ्यात एक न एक क्षण आनंदाने उपभोगलेला असतो...समाधानाचा असतो...
ह्या क्षणाला मी नाव दिले आहे " माहेर" आणि ह्या क्षणाला जिवंतपणा देणारे ते आई बाबा...♥️

Wednesday, June 27, 2018

Love You Zindagi...

इतनीसी हसी, इतनीसी ख़ुशी, इतनासा तुकडा चाँद का, ख्वाबोके तिनकोसे, चल बनायें आशिया ....
बर्फी Movie मधील हे एक गाणं...बर्फी ...एक मुकं बधिर मुलगा....बोलता येत नाही किंवा ऐकू येत नाही ह्याची तमा न बाळगता मस्त आपल्या धुंदीमध्ये अल्लडपणे बागडणारा असा हा बर्फी ....सर्वाना हसवणारा...सर्वाना खुश करणारा...स्वतःवर मनापासून प्रेम करणारा, येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना सहजपणे मदत करणारा...लहान मुलात लहान होणारा.. रडणार्याच्या चेहऱ्यावर हसू आणणारा आणि त्यांनी दिलेले आशीर्वाद घेऊन आनंदाने पुढे जाणारा.. आयुष्याला भरभरून जगणारा,  असा हा बर्फी सर्वाना लाडका असतो.... असा हा बर्फी ऐकू आणि बोलू शकत नाही ह्यापेक्षा आयुष्य खूप छान आहे असे मानतो.. खरंच आपल्या सारख्या ऐकू वाचू आणि बोलू शकणाऱ्या सामान्य लोकांना सुद्धा एक सुरेख lesson देऊन जातो...
कोणी एक शहरातून आलेली मुलगी अचानक त्याला भेटते...त्याच्या स्वभावामुळे त्याच्या नकळत प्रेमात पडते...कॉलेज मध्ये आवडणाऱ्या सर्वात handsome मुलाने propose करून दिलेली एंगेजमेंट रिंग, तिला बर्फीने झाड्याच्या काडीपासून  तयार केलेल्या आणि तिला मनापासुन घातलेल्या रिंगपुढे अगदीच फिकी वाटू लागते...सर्व काही तिच्या मनासारखे घडत असताना , तिचे तिलाच कळतं नाही कि ती ह्या भोळ्या भाबड्या  बर्फीच्या प्रेमात पडली आहे...
स्वतःच्या आनंदापुढे तिचा आनंद मोठा मानणारा बर्फी तिच्या चेहऱ्यावर हसू दिसण्यासाठी खूप धडपड करत असतो...आणि नकळत तो सुद्धा तिच्या प्रेमात पडतो... न बोलता न ऐकू येता  , तिचे प्रेम फक्त तिच्या डोळ्यातून आणि तिच्या हावभावांमधून सहजपणे समजून घेणारा बर्फी तिला ऐकू बोलू शकणाऱ्या पण प्रेमाचा अर्थ न केलेल्या तिच्या होणाऱ्या नवरापेक्षा खूप जवळचा वाटू लागतो...
कॉलेज मध्ये असल्यापासून ज्याच्यावर आपले "crush " होते, ज्याच्या मागे पुर्ण कॉलेज फिदा होते, अश्या स्वप्नातल्या राजकुमाराने आपल्याला मागणी घातली तेव्हा आपल्याला आकाश ठेंगणे झाले होते... त्याच्या सहवासात दिवस जात असताना त्याचा स्वभाव लक्षात येत होता...स्वतःच्या सौंदर्याच्या गर्वापुढे त्याला मिळालेले प्रेम हे फक्त साधन वाटत होते...आणि एकीकडे तिच्या प्रेमाची भाषा न ऐकू येता तिला ओळखणारा असा बर्फी मात्र तिला मनापासुन प्रेम करत होता...
तिच्या मनाची चलबिचल...निवड करताना होणारी गोंधळून टाकणारी अवस्था बर्फी हेरतो...आणि सहज तिला न दुखावता तो अलगदपणे तिच्या आयुष्यातून निघून जातो...
पुढे प्रेमाच्या शोधात निघालेला बर्फीला त्याच्यासारखीच जोडीदार भेटते...मनोरुग्ण असून सुद्धा त्याच्यावर प्रेम करणारी हीच आपली जोडीदार आहे...हे त्याला लक्षात येते...शेवटी तो सुद्धा ह्याचं प्रेमाच्या शोधात असतो... तिकडे आपल्या जोडीदारासोबत लग्न करून सुद्धा बर्फीवर प्रेम करणारी "ती" बर्फी ला त्याच्या खऱ्या प्रेमासोबत पहाते आणि अतिशय समाधानाने त्या दोघांकडे बघून निघून जाते...
खूप सुंदर स्टोरी...अतिशय मार्मिक अशी... एकीकडे देवाने सगळं काही चांगलं दिला असताना सुद्धा समाधानी नसलेला माणूस आणि एकीकडे काहीतरी कमी , उणीव असताना सुद्धा त्याला positively घेऊन पुढे जाणारा माणूस.. खरंच आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतो...
आपल्या आयुष्यात सुद्धा अशी माणसे आपल्याला भेटतात...आणि खरंच हि माणसे आपल्यापेक्षा किती तरी पटीने आनंदी, समाधानी असतात...का, का बरं ती एवढी आनंदी, समाधानी असतात...काहींना ऐकू येत नसते..काहींना बोलता येत नसते...काहींना दिसत नसते, काही पंगू असतात...काही mentally handicap असतात...काही गरिबीमुळे हतबल असतात..कधी तुम्ही ह्या लोकांना नीट पहिले आहे?..कधी त्यांना जवळ केले आहे? कधी त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला आहे?
माझ्या आयुष्यात सुद्धा अशी खूप माणसं भेटली...आयुष्य साधं simple आणि खूप सुंदर आहे हे त्यांनी मला खऱ्या अर्थाने शिकवले...
माझ्या सोसायटी मध्ये एक कुटुंब आहे ज्यामध्ये वडील आणि २ मुली आहेत...लहानपणापासूनच गरीब घरामध्ये जन्म झाल्यामुळे साधी राहणी, काटकसर आणि स्वभावामध्ये गोडपणा सहजपणे आला आहे.. लहानपणी आई वडिलांच्या भांडणामुळे आई पासून दुरावलेल्या मुली, घरामध्ये अन्न धान्यांपासून असलेली चणचण ओळखून काटकसरीने वागणाऱ्या , हुशार असल्यामुळे शिक्षणाची जिद्द आणि त्यामुळे परिस्थितीवर मात करून शिकून नोकरीला लागलेल्या, अश्या ह्या चिमुरड्या मुली जेव्हा दिसतात तेव्हा नकळत मन भरून येते.. आजही सकाळी सकाळी हातात एक छोटी पिशवी घेऊन निघालेली "ती" घरातली मोठी मुलगी मला रोज दिसते.. साधासा पण नीटसर पंजाबी ड्रेस घालून, केसची तेल लावून चापून चोपून वेणी घालून  , वेणीला घट्ट बांधायला लागणारी  कापडी चिंधी व्यवस्थित लावून, घरातली २ मोगऱ्याची फुले केसात माळून, चेहरा प्रसन्न ठेऊन, ती कामाला निघालेली असते... ऑफिससाठी जाताना मी तिला हात करते...माझ्याकडे बघून एक सुंदर हसू देऊन ती मला बाय करते..माझ्या चेहऱ्यात आणि तिच्या चेहऱ्यात मात्र एवढाच फरक असतो.... तिचा चेहरा दुःख्खात सुख शोधणारा तर माझा सुखात टेन्शन घेऊन वावरणारा …माझा चेहरा शांत  असतो..भारावलेला...आणि तिचा नेहमी समाधानाने स्मित करणारा...
दुसरी अशीच एक मस्त आणि आपल्या विश्वात रमणारी व्यक्ती म्हणजे आमच्या बसचा ड्राइवर...रोज तेच तेच काम करत असताना आपण कितीतरी कुरबुरी करतो...कितीतरी वेळा कंटाळा करतो..चिडतो , रागावतो..परिस्थितीला नावं ठेवतो...पण कितीही पाऊस, कितीही ट्रॅफिक जॅम असला तरी त्याच उत्साहाने हा माणूस आपली डौलदार बस दिमाखात चालवत असतो...बस मध्ये गाणी लावून त्यावर किशोर कुमारच्या गाण्यावर हळुवार सूर लावून  गाणारा...प्रत्येक स्टॉप वरच्या प्रवाश्याला हाताने राम राम करणारा, आणि ऐटीत हसत बस स्टॉप वर लावून पुढे ऐटीत जाणारा तो, सुख हे पैश्यावर नाही तर समाधानावर माना...असे कदाचित तो सांगून जात असावा...खरंच मनाने दिलदार असणारा असा हा एखाद्या  राजापेक्षा कमी वाटत नाही...
ऑफिस मध्ये सकाळी आमचा ladies कट्टा जमतो...घाई गडबडीत आवरून आलेल्या...काही जणी एकदम दमलेल्या...सकाळी सकाळी झालेले घरातील वाद विवाद, विसंवाद सांगण्यात एकदम मग्न झालेल्या असतात.. तिथेच एक इटुकली मुलगी थांबलेली असते...सगळ्यांचे expressions, त्यांचे बोलणे अगदी मन लावून ऐकत असते.. मी तिला खूप वेळा पाहायचे...अधे मधे बऱ्याच वेळा गाठ पडायची...मला कुठूनही बघितले तरी ती जोरात हाथ हलवून गोड हसायची...असेच एकदा आम्ही दोघी सकाळी भेटलो , नेहमी प्रमाणे तिने मला गोड smile देऊन hi केले...मी तिला म्हणाले "गुड मॉर्निंग "...ती थोडा वेळ थांबली आणि माझ्या चेहऱ्याकडे पहिले...मला वाटले तिला ऐकू गेले नसेल..म्हणून मी पुन्हा म्हणाले.." गुड मॉर्निंग प्रीटी लेडी  "..ह्यावेळेस तिने माझ्या ओठांकडे पहिले आणि मग माझ्याकडे बघून हसली आणि हातात हात घेतला ..एक warm  hand  shake करून ती निघून गेली...मला क्षणभर काही कळले नाही...नंतर एकीला विचारले असता कळले कि ती मूक बधिर आहे...ऐकता आणि बोलता न येता सुद्धा तिची सगळं ऐकून समजून घेयची मनस्वी iccha ...समोरची व्यक्ती नवीन असून सुद्धा तिला तिने दिलेला आदर आणि एक गोड हास्य... गुड मॉर्निंग चे lip tracing करून तिला समजले तेव्हा झालेला आनंद आणि माझा हातात घेतलेला हात...खूप खूप सुखद होते हे... जिथे आपण दुसर्यांबद्दल judgement करण्यात वेळ घालवतो, नवीन माणसाला लगेच स्वीकारत नाही, त्याच्या बद्दल उलट सुलट चर्चा करतो, त्याच्या personal  life मध्ये शिरतो आणि gossiping करतो...तिथे हा एक मुका जीव मात्र जीवाला जीव लावतो...आजहि ती जेव्हा भेटते आम्ही smile देतो आणि आता मी तिचा हात हातात घेते...दया , वात्सल्य , करूणा असा भावनेने नाही तर एक heart  तो heart  connection म्हणून...:)
मागच्या वर्षी माझे आजी आणि आजोबा एका पाठोपाठ गेले... आजी म्हणजे माझ्या वडिलांची आई ८९ वयाची पण अतिशय उत्साही, प्रेमळ , जीव लावणारी...वयाचे निमित्त होऊन ती सप्टेंबर मध्ये गेली...तिच्या पाठोपाठ आजोबा म्हणजे माझे आई चे वडील ९० वर्षाचे , ते सुद्धा वयाचे निम्मित करून नोव्हेंबरमध्ये गेले...घरामध्ये अचानक मोठी पोकळी निर्माण झाली...माणसांनी भरलेल्या घरामध्ये राहणारी मी, खूपच एकटी झाले होते....बरेच दिवस खरंच वाटत नव्हते के हे दोघं आता आपल्यात नाहीत...सर्वाना सावरायला खूप काळ लागला...
एके दिवशी बाबांनी आईला सांगितले कि, काकांचे म्हणजे माझ्या आजोबांचे कपडे म्हणजे धोतर आणि शर्ट आपण समोरच्या एका बाबाला देऊ...शेजारी नवीन construction चालू झाले होते...तिथे एक आजोबांच्या वयाचे गृहस्थ घराची देखरेख करायला आले होते... पत्र्याचे शेड, त्यामध्ये ४ विटा बांधून बनवलेली चूल, एक दोन भांडी , अंघोळीला बादली आणि घरामध्ये कडेला ठेवलेला एक छोटासा रेडिओ बस एवढाच त्यांचा संसार...रात्री झोपताना त्यांच्या रेडिओ मधली गाणी ऐकत ते तिथे कडेला झोपलेले असल्याचे... बाबानी त्यांना जेव्हा कपडे दिले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि गोड हसू मी कधीच विसरू शकत नाही...त्याचे ऋण म्हणून ते बाबाना अंगण झाडताना मदत करायचे..पाण्याची नळी बांधून देयचे आणि जाताना हाताने नमस्कार करून जायचे...
ह्या माणुसकी नसलेल्या जगात जेव्हा आपण एक माणूस दुसऱ्याचा मान अपमान करण्यात, त्याला खाली खेचण्यात , प्रसंगी मारहाण करण्यात मागे पुढे बघत नाही तेव्हा ह्या श्रीमंतीची खरंच लाज वाटते... खरी श्रीमंती हि मानाने श्रीमंत माणसांची आहे का ह्या मनाने श्रीमंत माणसाची...huh खरंच !!!
आता माझा जगाकडे बघायचा दृष्टीकोन खरंच बदलला आहे...आणि ज्या लोकांनी मला एवढे positive बनवले आहे त्यांना हे जग पुर्णपणे  पाहायला / ऐकायला / बोलायला / स्पर्शायाला / अनुभवायला सुद्धा मिळालेले नाही...humm.. पण आता मनात फक्त एक निश्चय केला आहे...जेव्हा केव्हा अशी माणसे भेटतील त्यांच्या सोबत खूप खूप वेळ घालवायचा आहे.. मंदिरापासून जाताना उदबत्ती विकणाऱ्या बाई कडून मी सहज उदबत्त्या विकत घेते... हात नसताना पायापासून तयार केलेले वस्तू , अंधांनी तयार केलेल्या मेणबत्या...अनाथालयात राहणाऱ्या मुलांनी दिलेली चॉकलेट्स जेव्हा मिळतात तेव्हा असा वाटते कि कोणतेही कुरबुर न करता आहे त्या परिस्थितीमध्ये कसे आनंदाने राहायचे हे अजून कोणीच सांगूच शकत नाही...सर्वसंपन्न आयुष्य दिला असताना केवळ तक्रारी, कुरबुर, टेन्शन घेऊन आजाराला निमित्त बनवणारे आम्ही खरेच आयुष्य जगतो का ज्यांना हे जग पाहता , ऐकता, लिहिता , वाचता , अनुभवता येत नाही ते जगतात?
डोळ्यासमोरून सगळे चेहरे हलकेच निघून जातात...आणि मनःपटलावर एक गाणे कायम वाजत राहते...
कभी हाथ पकडके तू मेरा चलदे , चलदे ... कभी हाथ छूडाके में तेरा चलदु , चलदु
में थोडीसी मूडी हू , तु थोडीसी तेढी है ...क्या खूब ये जोडी है...'तेरी मेरी...
जाने दो, जाने दो, दिलसे चले जाने दो, केहेदो घबराहट को, bye bye bye
आने दो, आने दो, दिल में आ जाने दो, केहेदो मुस्कुराहट को...Hi Hi Hi
Love you zindagi ...Love you zindagi ...Love you zindagi ...Love me zindagi ..

I have special place for her in my heart !!!

It’s a memory flash by google and showing memories 4 years ago….wooowhhh…a tiny face with pretty eyes are looking at me….smiling and crawlin...